आधी प्रेम मग तिरस्कार
..असं का?
बायकांना जशी मान्यतेची गरज वाटते तशीच गरज पुरुषांना पसंतीची वाटते.
पुरुषाचे त्याच्या प}ीवर जेवढं अधिक प्रेम असेल तेवढी त्याला तिच्या
पसंतीची अधिक गरज वाटते. नातेसंबंधांच्या सुरुवातीच्या काळात दोघंही
एकमेकांच्या गरजा पुरवत असतात. ज्या पुरुषाला प}ीकडून अशी खास पसंती मिळत
असताना अचानक तिनं ती काढून घेतली तर ते त्याच्यासाठी फार दु:खद असू शकते.
बायका मात्र याबाबतीत फारच अनभिज्ञ असतात. आणि आपलं हेच वागणं बरोबर आहे
अशी त्यांची खात्री असते. पुरुषांना हृदयसिंहासनावर बसवणं हे त्यांच्यासाठी
किती गौरवाचं असतं व हृदयसिंहासनावरून खाली उतरवणं किती अपमानास्पद असतं
याची बायकांना कल्पना नसते.
नातेसंबंध सुरुवातीच्या काळात इतके यशस्वी का असतात याचं एक कारण असं
की, अजूनही तो तिच्यासाठी कोणीतरी खास असतो. तिच्यासाठी तो तेजानं तळपणारा
शूरवीर असतो. त्याला तिची पसंती मिळण्याचं भाग्य लाभतं, ज्यामुळे तो हवेत
तरंगतो. पण ज्याक्षणी त्याच्याप्रती असलेली तिची पसंती नापसंतीमध्ये बदलते
आणि अचानक त्याची रवानगी तिच्या परिघाच्या बाहेर जाते. स्त्रिया सहसा
त्याच्या वागणुकीसंबंधीची उलटतपासणी इतक्या नापसंतीनं करतात त्यामुळे तो
जखमी होतो. स्त्रिया हे हेतुपरस्सर करतात, कारण त्यामुळे आपण त्याला धडा
शिकवला असे त्यांना वाटते. पण हे खरं नसतं. त्यामुळे फक्त भीती आणि संताप
निर्माण होतो आणि हळूहळू पुरुष अधिक निष्क्रिय बनत जातो.
नवरा-बायकोच्या भांडणात वादाला सुरुवात कोण करतो हा संशोधनाचा विषय
असतो. थोडंसं संशोधन केलं तरी ब:याच भांडणात भांडणाला सुरुवात करण्यासाठी
बायकाच पुढाकार घेताना दिसतात. त्याही जाणूनबुजून नव्हे, तर नकळतपणोही
वादाला सुरुवात करतात.
आपल्या भावना, आवडी-निवडी, निराशा स्त्रिया स्पष्ट शब्दात व्यक्त करत
नाहीत. त्याऐवजी नाटकी स्वरूपात प्रश्न विचारतात आणि नकळतपणो आपली नापसंती
वेगळ्या पद्धतीनं पोहोचवतात. परंतु पुरुषांर्पयत त्याचा चुकीचा संदेश जातो.
उदाहरणार्थ जर नव:याला घरी यायला उशीर झाला तर बायको त्याला विचारते, ‘तू
इतका उशीर करूच कसा शकतोस?’ किंवा ‘तू फोन का नाही केलास?’ बायकोच्या या
बोलण्यातून नव:याला असा संदेश मिळतो की, ‘तू उगाच थापा मारू नकोस. कोणतंही
सयुक्तिक कारण तुङया उशिरा येण्यामागे नाही. तू बेजबाबदार आहेस.’
‘तू फोन का नाही केलास’ असा प्रश्न विचारण्यात काही गैर नाही. पण
केव्हा, जेव्हा बायकोला खरोखर नव:याच्या उशिरा येण्यामागचं कारण जाणून
घ्यायचं असेल तेव्हा. पण बायको जेव्हा चिडलेली असते तेव्हा तिला फोन न
करण्यामागचं कारण जाणून घेण्यात काहीच रस नसतो. तिला फक्त तिचा मुद्दा
सिद्ध करायचा असतो की, तुमच्या उशिरा येण्यामागे कोणतंही स्वीकारार्ह कारण
नाही.
पुरुषाला त्या प्रश्नामागच्या तिच्या भावना समजत नाही. उलट तिची
नापसंतीच त्याच्यार्पयत पोहोचते. त्याला जबाबदार धरण्याची तिची आगंतुक
इच्छा त्याच्या डोक्यात जाते. मग त्याला एकदम आपल्यावर कोणीतरी हल्ला करते
आहे असे वाटते आणि मग तो बचावात्मक पवित्र घेतो आणि एखादं तिरसट उत्तर
देतो,
‘हो ना! बॉसनं मला जेवायला ठेवून घेतलं होतं.’
वादाची खरी सुरूवात
जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांचे दृष्टिकोन मान्य करतील, एकमेकांशी
आस्थेनं बोलतील तेव्हा त्यांच्यामध्ये वादविवाद उरणारच नाहीत. आपल्यातील
मतभेद ते योग्य प्रकारे चर्चा करून मिटवतील. पण बहुतेकवेळा असं होतच नाही.
जेव्हा एखादा पुरुष एखादी चूक करतो किंवा एखादी गोष्ट करायला विसरतो
किंवा एखादी जबाबदारी पार पाडणं त्याला जमत नाही तेव्हा स्त्रीच्या हे
लक्षात येत नाही, की तो किती हळवा झाला आहे! खरंतर अशावेळी त्याला प्रेमाची
सर्वात जास्त गरज असते. परंतु अशावेळी स्त्रिया आपली नापसंती नजरेतून आणि
स्वरांमधून त्याच्यार्पयत पोहोचवतात. कदाचित तिचे शब्द फारसे वाईट नसतीलही;
पण तिची नजर आणि तिचा स्वर पुरुषाला विद्ध करणारा असतो. तो तिचं बोलणं
हाणून पाडण्यासाठी तिची मतं चुकीची ठरवून स्वत:चं समर्थन करतो.
आणि मग ठिणगी पडते! भांडण पेटतंच!